Monday, December 30, 2013

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

 ....सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प... नवीन वर्ष....

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
***नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

....बरेच जन नवीन काही तरी करायचं असं ठरवतात...मस्त सुरुवात करतात...पण काही न काही कारणामुळे ते पूर्ण करायचं राहून जातं.  कारण काय तर सातत्याचा अभाव....!!!
.... सातत्य..किती लहानसा शब्द आहे हा...पण चांगलाच घाम गाळतो आपला. जीवनात कुठलीही गोष्ट करायला...सातत्य हवंच... (अगदी मुंबई-पुणे-मुंबई ह्या सिनेमा मधल्या "अभिमान हवा" ह्या डायलॉग प्रमाणे.. ठासून) .....
......एखादी छान अशी गोष्ट सातत्याने का नाही होतं.  ती मला लागत नाही म्हणून.???? म्हणजे आपल्याला भूक कशी लागते, ते लागणं. भूक लागते म्हणून आपण जेवतो, तहान लागते म्हणून आपण पाणी पितो. मग परत विचार आला ह्या तर मुलभूत गरजा आहेत ह्यांच्या शिवाय तर जगणं अवघड. !!!
...पण मग सचिन का म्हणतो कि मी क्रिकेट शिवाय जगू नाही शकत...? बच्चन का म्हणतो कि अभिनयच माझ्यासाठी सगळं काही आहे?  असं कसं शक्य आहे? ह्या तर मुलभूत गरजा नाही वाटत मग...पण मग परत विचार आला कि हे सहज शक्य आहे...पण केव्हा..जेव्हा आपली आवडच आपलं जीवन बनते...मग ती आवड एखादी वस्तू, सवय किव्वा व्यक्तीहि  असू शकते.

....समजा मला छान लेखक बनायचं आहे तर रोज ३०० -४०० शब्द लिहिलेच गेले पाहिजे, विषय कोणताही का असेना चालेल, पण रोज मनातून पानावर लिहिलेच गेले पाहिजे. कविता नाही तर चारोळ्या तरी केल्या गेल्या पाहिजेत.
....जिम मध्ये आठवड्यातून कमीत कमी ५ वेळा गेलंच पाहिजे (कधी फक्त हात पाय हलवून आलात तरी चालेल पण सवय तुटायला नको) ....


.... असं जर का केलं तर उशिरा का होयीना लेट पण थेट जाऊ...म्हणजे जे हवं ते साध्य करूच....

***नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....!!!

No comments:

Post a Comment